Friday 7 January, 2011

आकडे सांभाळायचे की खेळ खेळायचा?

काल हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ड्रॉ झाला. (की ड्रॉ केला म्हणू या) काल शेवटच्या दिवशी हिंदुस्थानला ३४० रन्स करायच्या होत्या त्या तब्बल ५४० बॉल्स मध्ये पण आपल्या सेह‘वाघ’ची सुरुवात बघून कळले की आपण हा सामना जिंकायचा विचारच केलेला नाही.

काल खरच इतके स्लो खेळायची आवश्यकता होती का? आपण वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहोत. मनात विचार आला याजागी ऑस्ट्रेलिया किंवा खुद्द दक्षिण आफ्रिका खेळत असती तरी त्यांनी १००% सामना जिंकण्यासाठी खेळला असता. आपल्याकडे विरेंद्र सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन असताना ड्रॉ करण्याचा निर्णय अगोदर घेणे म्हणजे कसेही करुन एक नंबर टिकवून ठेवण्यासाठी केलेली ऍडजस्टमेंट म्हणू या.

कालच्या सामन्यात विरुने ४० खेळला आणि सचिन तब्बल ९१ बॉल्स खेळला तरीही आपला स्कोरबोर्ड पाहिजे तसा दिसला नाही. कुर्मगतीने खेळून खरे तर आपल्या संघाने आपल्या क्रिकेटप्रेमींची निराशा केली. निदान सेहवागला त्याचा नैसर्गिक खेळ करु दिला असता आणि त्याने स्फोटक खेळून कमी वेळात जास्त रन्स केले असते तरी आपले टारगेट कमी झाले असते आणि पुढे सचिन फॉर्ममध्ये असताना किमान ७०-७२ च्या रेटने रन्स करु शकत असताना आपण जिंकायचा सामना ड्रॉ केला असेच म्हणावे लागेल.

वर्ल्ड कप तोंडावर असताना जर कोणी म्हणत असेल की मालिका हरली असती तर आत्मविश्वास गेला असता पण यापुढील वन-डे मालिका हरली तर हे वर्ल्ड कप साठी कुठूण आत्मविश्वास आणणार आहेत? महेंद्रसिंग धोनीने आपल्या कर्णधारपदी असताना अजून कुठलीही मालिका हरलेली नाही, म्हणून तो अजेय आहे असे म्हणता येणार नाही. यशाबरोबर अपयश आल्याने त्याची मज्जा सुद्धा चाखताना बरे वाटते. पण कालच्या या निर्णयामुळे खरेच आपण आकडे सांभाळत बसलो असे वाटते. 

No comments: