Showing posts with label Team India. Show all posts
Showing posts with label Team India. Show all posts

Sunday, 20 February 2011

बांग्लादेशला आपण चिरडायला हवे होते

काल आपण बांग्लादेशवर एक मोठा विजय मिळवून विश्वचषकाची सुरूवात अगदी दणक्यात केलेली आहे. जणू १७ फेब्रुवारीचा उद्धाटन सोहळा अजून संपला नव्हता. विरूने मागच्या विश्वचषकाचा वचपा काढायचा होता तो अशा प्रकारे असेल याची कुणीही कल्पना केलेली नसेल. विराट कोहलीबद्दल काही न बोललेले बरे आहे, हा गडी एकदिवसीय सामने खेळायला लागल्यापासून विकेटवर सेट झालेला आहे. विराटने मागच्या २०१० वर्षात ९९५ धावा केल्यात आणि या वर्षाची सुरूवात त्याने दक्षिण आफ्रिकेतून केलेली आहे.

हा विश्वचषक हिंदुस्थानच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. सचिनचा शेवटचा विश्वचषक असल्याने तो सचिनसाठी जिंकला जावा अशी तमाम हिंदुस्थानवासियांची भावना आहे, आणि विरूच्या खेळीतून हे स्पष्ट झाले. यापूर्वी विश्वचषक आयोजक देश स्पर्धा जिंकत नसत, पण १९९६ला श्रीलंकेने हे खोडून काढलेय. मागचा उपखंडातील विश्वचषक श्रीलंका जिंकू शकते तर आता आपणही जिंकलोच पाहिजे, असे म्हणणे चुकीचे नाही.

काल सकाळी वर्तमानपत्रातील विश्वचषकाचे बांग्लादेशाविरूध्दच्या २००७ च्या सामन्याबाबत लिहिलेले होते. बांग्लादेशाविरूध्दची हि चिड गेली ४ वर्षे प्रत्येक हिंदुस्थानींच्या मनात जखम करून बसली होती, या विश्वचषकात ही संधी उद्घाटनाच्या सामन्यात चालून आली. अपेक्षेप्रमाणे फलंदाजीमध्ये आपण बांग्लादेशाला अक्षरश: बुकलून काढलेले आहे. एखाद्या सामन्यात ३७० धावा काढणे हे कधीच सोप्पे नसते. पण तरीही विजयाची किमान अपेक्षा १०० धावांची होती ती काही पूर्ण करू शकलो नाही. विजय हा विजय असतो, मग तो १ धावेने का असे ना विजयाचे महत्व कधीच कमी जास्त नसते.  असो आपली गोलंदाजी हा कच्चा दुवा आहेच, आणि खिशात ३७० धावा असताना अशा चुका सुधारण्याची संधी नक्कीच आहे.

पहिला सामना जिंकून आपण विश्वचषकाची सुरूवात खुप चांगली केलेली आहे. आता पुढेही चांगला खेळ करून विश्वचषक जिंकावा यासाठी आपल्या संघाला मनापासून शुभेच्छा!

Friday, 7 January 2011

आकडे सांभाळायचे की खेळ खेळायचा?

काल हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ड्रॉ झाला. (की ड्रॉ केला म्हणू या) काल शेवटच्या दिवशी हिंदुस्थानला ३४० रन्स करायच्या होत्या त्या तब्बल ५४० बॉल्स मध्ये पण आपल्या सेह‘वाघ’ची सुरुवात बघून कळले की आपण हा सामना जिंकायचा विचारच केलेला नाही.

काल खरच इतके स्लो खेळायची आवश्यकता होती का? आपण वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहोत. मनात विचार आला याजागी ऑस्ट्रेलिया किंवा खुद्द दक्षिण आफ्रिका खेळत असती तरी त्यांनी १००% सामना जिंकण्यासाठी खेळला असता. आपल्याकडे विरेंद्र सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन असताना ड्रॉ करण्याचा निर्णय अगोदर घेणे म्हणजे कसेही करुन एक नंबर टिकवून ठेवण्यासाठी केलेली ऍडजस्टमेंट म्हणू या.

कालच्या सामन्यात विरुने ४० खेळला आणि सचिन तब्बल ९१ बॉल्स खेळला तरीही आपला स्कोरबोर्ड पाहिजे तसा दिसला नाही. कुर्मगतीने खेळून खरे तर आपल्या संघाने आपल्या क्रिकेटप्रेमींची निराशा केली. निदान सेहवागला त्याचा नैसर्गिक खेळ करु दिला असता आणि त्याने स्फोटक खेळून कमी वेळात जास्त रन्स केले असते तरी आपले टारगेट कमी झाले असते आणि पुढे सचिन फॉर्ममध्ये असताना किमान ७०-७२ च्या रेटने रन्स करु शकत असताना आपण जिंकायचा सामना ड्रॉ केला असेच म्हणावे लागेल.

वर्ल्ड कप तोंडावर असताना जर कोणी म्हणत असेल की मालिका हरली असती तर आत्मविश्वास गेला असता पण यापुढील वन-डे मालिका हरली तर हे वर्ल्ड कप साठी कुठूण आत्मविश्वास आणणार आहेत? महेंद्रसिंग धोनीने आपल्या कर्णधारपदी असताना अजून कुठलीही मालिका हरलेली नाही, म्हणून तो अजेय आहे असे म्हणता येणार नाही. यशाबरोबर अपयश आल्याने त्याची मज्जा सुद्धा चाखताना बरे वाटते. पण कालच्या या निर्णयामुळे खरेच आपण आकडे सांभाळत बसलो असे वाटते.