Monday 24 January, 2011

हिंदुस्थानात तिरंगा फडकविणे म्हणजे गुन्हा?

भाजपच्या युवक मोर्च्याने २६ जानेवारी हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनी काश्मिरमधील लाल चौकामध्ये तिरंगा फडकविण्याचे ठरविले आणि तशी तिरंगा यात्रा देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून सुरु झाल्या. परवा २६ जानेवारी आहे, तिरंगा यात्रा आज पंजाबमधून काश्मिरच्या दिशेने निघत आहे. परंतु काश्मिरमधील सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मुख्यमंत्र्यांना भिती वाटतेय की यामुळे काश्मिरचे सामाजिक स्वास्थ बिघडेल, काश्मिरमध्ये अशांतता पसरेल..

भाजपसुद्धा काश्मिरमध्ये तिरंगा फडकवून लोकांपर्यंत पोहचण्याचे राजकारण करतेय हे सत्य आहे. परंतु चुकीचे असे नक्कीच काही करत नाही. ज्या राज्यघटनेचा वारंवार उल्लेख केला जातो त्याच घटनेच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकविणे हे कॉंग्रेसच्या दृष्टीने पाप म्हटले जातेय, हे राज्यघटनेचेच दुर्दैव म्हणायला हवे. भाजपवाले तिरंगा आपल्याच देशाच्या जमिनीवर फडकवत असल्याने त्यात विशेष असे काहीच म्हणता येणार नव्हते, पण तो तिरंगा भाजपवाले फडवत आहेत म्हणून कॉंग्रेसच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांनी यामध्ये राजकारण आणले.

कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील फुटीरतावाद्यांमुळे अगोदरच तिथे अशांतता असताना तिरंगा फडकविल्याने आणखी परिस्थिती खराब होईल म्हणजेच हे दोन्ही पक्ष स्वत:च सांगत आहेत की यांना सरकार चालविणे कठीण जातेय. फुटीरतावादी शक्ती या देशात पसरविली कोणी? तर कॉंग्रेसवाल्यांनीच! तब्बल ६० वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसने या देशासाठी काहीच केले नाही हे सत्य आहे, परंतु जर काही केले असेल तर देश-विघातक कारवाया करणाऱ्यांचे बळ वाढविणे. याबाबतीत पुढे कॉंग्रेसवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील सामाजिक स्वास्थ्य बिघडेल म्हणजेच कॉंग्रेसवाले सर्वसामान्यांची किती काळजी घेत आहेत बघा!

काश्मिरमध्ये तिरंगा फडकविल्याने हिंदुस्थान देशातील एका प्रांताचे सामाजिक स्वास्थ्य कसे बिघडू शकते? असे म्हणणाऱ्यांना उघडे करुन चाबकाचे फटके दिले पाहिजेत. जर तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याने देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे त्याची जबाबदारी कॉंग्रेस घ्यायला तयार आहे? अफजल गुरुने देशाच्या संसदेवर हल्ला करुन देशाचे नाक कापून देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवले त्याला सुप्रिम कोर्टाने ऑक्टोबर २००६ ला फाशीची सजा दिलीय पण कॉंग्रेसवाल्यांनी त्याला सोनियाचा जावई बनवून ठेवला घेतला आहे. २६/११ ला मुंबईमध्ये ७२ तास धुमाकूळ घालणाऱ्या कसाबच्या टोळीने आणखी एकदा देशाची मान शरमेने झुकवली, पंतप्रधान मुंबईकरांचे कौतुक करतात पण कसाब कसा सुरक्षित राहिल याची काळजी कॉंग्रेसवाले आणि सोबत राष्ट्रवादीचे आबा पाटील आणि भाजपाचे एकनाथ खडसे करत आहेत. मुंबईमधील वाढत्या लोंढ्यांनी मुंबईचे स्वास्थ्य रोजच बिघडत आहे. मुंबईची अवस्था परप्रांतियांनी खराब केली आहे. करदात्या मुंबईकरांना सुविधा पुरविताना महानगरपालिकेच्या नाकी नऊ येत असताना इथेही कॉंग्रेसवाले काही ठोस निर्णय घेत नाहीत, आणि तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ बिघडेल म्हणून इतकी काळजी?

या सर्व गोष्टींना कोण जबाबदार असेल तर जनता. झोपी गेलेली जनता कधी जागी होणार आहे की नाही ते माहित नाही. देशप्रेमींना या देशात देशद्रोही ठरविण्याचे काम कॉंग्रेस मागची अनेक वर्षे करीत आहे. सावरकर्, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्यांचा कधीही सन्मान केला गेला नाही. तरीही ही झोपी गेलेली जनता आजही कॉंग्रेसच्या चिपळ्या वाजवतेय हेही या देशाचेच दुर्दैव!

4 comments:

alhadwrites said...

कॉंग्रेसचा धिक्कार असो . लाज वाटायला पाहिजे यांना पाकिस्तानची चाटूगिरी करताना

Shubham Shrotri said...

iskeliye ek he jawab hai....Shri.Bal Thackeray

sharayu said...

ौहग४३तिरंगा फडकविणे हे राष्ट्रप्रेमाचे एकमेव गमक आहे काय?

Anonymous said...

Tantalizingly, but not realistically, one would possibly hope that a fast glance on the spinning rotor would possibly spur a solid guess and an auspicious placement of 1xbet chips. This roulette wheel options the usual black and red numbers and features a ball. Place the green felt cowl down and you instantly have your individual gaming desk. Also included are betting chips and a set arm, giving you everything want to|you should|you have to} throw the proper casino party or Vegas-themed party. Close-up white casino roulette with slot machine, chips and dice.