Wednesday 9 February, 2011

मिडीयाला आत्मपरीक्षणाची गरज आहे

काही वर्षापासून मिडीया हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेक घटनांची माहिती घरबसल्या मिळत असल्याने देशात वृत्तचित्र वाहिन्यांना लोकांनी डोक्यावर उचलून धरले. एका इंग्रजी चित्रपटात एक डायलॉग आहे, जेव्हा शक्ती मिळते, तेव्हा जबाबदारीही येते. आज आपल्याकडची मिडीया याच्या परस्परविरोधी वर्तन करताना दिसतेय. एखाद्या संघटनेला, व्यक्तीला किंवा समुहाला टारगेट करून बातम्या बनविणे हा यांचा धंदा बनलेला आहे. अर्थात चांगले पत्रकार नाहीतच असे मुळीच म्हणायचे नाही.

मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो पण ज्याप्रमाणे राजकारणी मोकाट सुटू लागले अगदी तशीच मिडीयासुध्दा आज मोकाट सुटलेली आहे. कधी, कुठे, काय दाखवायचे याचे भान नसलेले काही पत्रकार जेव्हा नैतिकतेची भाषा करतात तेव्हा हसावे की रडावे तेच कळत नाही.
हल्लीच अजीत पवार यांनी मिडीयासाठी दंडुक्याची भाषा केलीय. जनतेलाही तसेच वाटते की मिडीयावर कुणाचे तरी नियंत्रण असले पाहीजे. कुठल्याही सी ग्रेड चित्रपटाप्रमाणे काही दृष्ये दाखवताना हे कधीच काही विचर करत नाही का? की टीआरपी साठी हे आता काहीही करायला तयार आहेत? केवळ पैसा आणि टीआरपी याचसाठी असे सगळे चालणार असेल तर अजीत पवार चुकीचे बोलले असे मुळीच वाटत नाहीत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वत: एक पत्रकार असताना अनेकदा पत्रकारांवर तुटून पडतात, म्हणून जवळजवळ सर्वच चॅनेलनी शिवसेनेवर अघोषीत बहिष्कार टाकलेला आहे. शिवसेनेच्या चांगल्या गोष्टी नकारात्मक पध्दतीने दाखवून पत्रकार आपल्याच प्रोफेशनशी नकळत बेइमानी करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहिद उन्नीकृष्णनच्या काकांनी शहिदांना न्याय मिळत नाही म्हणून जाळून स्वत: ला जाळून घेतले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ही खरं तर खुप मोठी घटना आहे. पण आमचे पत्रकारांना याबद्दल दखल घ्यावेसे वाटले नाही. एखादी मोठी घटना घडते आणि मिडीयामध्ये येत नाही तेव्हा लोकांनाही अशा घटना समजत नाहीत. याला जबाबदार कोण?

मिडीयाला बोलले किंवा हल्ला झाला की उगाच थिल्लर चाळे करण्यापेक्षा अशा घटना का घडतात हे एकदा मिडीयावाल्यांनीच तपासावे. इतरांना सल्ले देणे सोपे असते पण स्वत: आचरणात आणणे कठीण असते.

No comments: